Thursday, March 29, 2012

दिवेआगर प्रवास

जवळपास अडीच ते तीन वर्षांनंतर लांबचा प्रवास करायची आमची मनीषा जागी होऊ लागली. परंतु साथ मिळेना. मित्रांना कुठेतरी लांब फिरायला जाऊ म्हणल्यावर एकही जण तयार होत नव्हता, म्हणून आमची मनीषा मनीच राहिली. अनायासे ह्या वीकेंडला पाडव्याची सुट्टी आली, आणि तीन दिवस सलग सुट्ट्या आल्या. आमचा अग्निमित्र नारा, त्याला मी १-२ वेळेस विनवणी करून पहिली, आणि तो तयार झाला. दोघांकडेसुद्धा 'खास' कारण होतं प्रवासासाठी. दोघांनीही नवीन महागडे कॅमेरे घेतले, परंतु कुठे फिरायला गेलोच नाही, म्हणून दोघांमधला फोटोग्राफर दडूनच होता. आम्हा दोघांना पण जास्त लोक नको होते. काय होत न, की एकही जण नाही म्हणाला, की प्लान फिस्कटतो. दिवस ठरला, आणि मंजिल पण ठरली. मंजिल होती दिवेआगर.
प्रश्न आला, कोणत्या गाडीने जावे? नाराची की माझी? नाराच्या गाडीला तूर्तास थोडा प्रॉब्लेम होता, चालता चालताच ती थोडी हलायची. रस्ता घाटमाथ्याचा म्हणून त्याला आणि मला काळजी, की रस्त्यात त्रास दिला तर काय कराव? माझी गाडी घ्यावी, तर तिला पेट्रोल जास्त लागतं, आणि थोडी गरम सुद्धा होते, पण चालते टकाटक. पण त्यांची लई इच्छा. गाडी घ्यावी तर त्याचीच. मी जास्त घासघीस न करता संमती दर्शवली, आणि गुरुवारी रात्री थेट त्याच्या घरीच गेलो.
गुरुवारी रात्री जरा थंड झोप घेतली, आणि सकाळी सहा वाजता गजराच्या आवाजाने उठलो. अंधार होता, आणि लोकांनी भीती सुद्धा घातली होती, की ताम्हिणी मधून जरा सांभाळून, कारण तिथे वाटमारी होते. म्हणून तो थोडावेळ थांबला. शेवटी ७ वाजेच्या सुमारास आम्ही बाहेर पडलो. पिंपरीमध्ये कधी गेलो नसल्याने त्याला सांगितलं, भई, कसाही मला चांदणी चौकापर्यंत ने. तिथून पुढे रस्ता दाखवायची जिम्मेदारी माझी. नेशनल हायवे ४ वरून निघालो, आणि पहिला फोटो हा घेतला.

लगेच न थांबता प्रवास सुरु. मध्ये थोडा वेळ थांबून चहा, नाश्ता केला आणि रस्ता पकडला. पिरंगुट, पौड मागे गेले, आणि आलं मुळशी. गावात न थांबता आम्ही पुढे गेलो, आणि लगेच टाटा पावरच्या प्लांट पुढे एक तळे होते, आणि सूर्याची किरणे त्यावर पडून मस्त सीन झाला होता, मोह न आवरल्याने नाराने मला बाईक थांबवायला लावली, आणि फोटोसेशन चालू. तिथला हा फोटो.


 अरे हो, इथे फोटो घेताना फोन वरच्या खिशात ठेवलेला होता, आणि कानात हेडफोन. कॅमेरा गळ्यात अडकवलेला, आणि फोटो घ्यायला कॅमेरा डोळ्याला लावला, आणि अचानक गाणी बंद झाली. क्षणार्धातच मला कळलं कि फोन खाली पडलाय. फोनची पाहणी करण्यात १० मिनिटे वाया गेली, पण पत्थरफोड फोन असल्यामुळे काहीही झाल नाही. प्रवास चालू झाला. एकामागून एक गावे सरत होती, आणि आता निर्मनुष्य रस्ता लागला होता. ४-४ ५-५ किलोमीटर पर्यंत चिटपाखरू सुद्धा दिसत नव्हते, आणि नारा मला किरकिर करत होता. "साल्या, कसल्या रस्त्याने घेऊन चालला मला. एक माणूस दिसत नाही, इथे कुणी आपल्याला मारून टाकलं तरी कुणाला कळायचं नाही". मी-"चूप बे, क्या लगता, मेरेको देख के कोई अपनेको मार्नेकी हिम्मत करेगा?".

शेवटी सो कॉल्ड क्रीपी ताम्हिणी घाट चालू झाला. नाराने बाईकची सूत्रे माझ्या हाती दिली, कारण रस्ता तसाच अवघड होता. १-२ स्पॉट फोटो काढून झाले, पण मनासारखे फोटो मिळत नव्हते. त्यातल्या त्यात एक अंधारी जागा होती, फक्त सूर्यकिरणाचा एक कवडसा येत होता, नाराला वाटलं ह्याचा एक फोटो होऊन जावा. तो फोटो काढायला गेला, तेवढ्यात भस्सकन कुत्रा भुंकला, आणि नारा कॅमेरा घेऊन पळत गाडीपर्यंत :P. गाडी पुढे सरकली, आणि एक थोडा प्रेक्षणीय स्पॉट मिळाला. फोटो काढला, पण एवढा विशेष जमला नाही. खाली पहा.

ताम्हिणी घाट अजून सरला नव्हता, तसा तो भरपूर मोठा घाट आहे. तिथे आम्हाला अजून काही स्पोट्स मिळाले.


ताम्हिणी घाट उतरताच एक एम.आय.डी.सी. लागते, तिथे थोडावेळ चहा घेऊन पुढे रस्ता पकडला, आणि जाता जाताच एके ठिकाणी जागा दिसली, जिथे झाडे जाळली होती. फोटो घ्यावा वाटला, आणि तो असा निघाला.


 त्यानंतर आम्ही जास्त कुठे थांबलो नाही, सूर्यनारायण तापत होता, आणि आम्हाला अजूनही बरंच अंतर कापायचं होतं. माणगाव गेलं, म्हसला गेलं आणि शेवटी दिवेआगरची ओढ लागली. हवेत थंडावा चालू झाला होता बोर्ली पंचायतन गेल्यावर लगेच दिवेआगरची कमान दिसली. आणि एक रिसोर्ट बुक झालं.  जरा थंडगार होऊन बसलो, आणि संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास किनाऱ्यावर गेलो. त्यावेळेस फोटोसेशन सुरु झालं. ते फोटोज खाली दिलेत.







अंधार पडला, आणि आम्ही रिसोर्ट मध्ये परतलो. रात्री थोड बसलो, आणि मग जेवण झालं. नंतर मला रात्री समुद्रावर फोटो काढायची हौस आली. एकदा एका ब्लोग वर नाईट फोटोग्राफी वाचली होती, सेम तसंच करून फोटो काढावा अशी इच्छा होती. नारा नको म्हणत होता, पण मी एकटा निघालो, म्हणून तो सुद्धा आला. किनारा जवळ आला की खवळलेल्या समुद्राचा आवाज येत होता. चोहीकडे भयान अंधार. आधीच दिवेआगर हे खूप छोटंसं गाव, म्हणून तिथे कुणीही नसायचं. मोबाईलचा टोर्च लावला, आणि फोटो काढायला गेलो, नारा बहुतेक बिचकूनच होता, परंतु त्याने दाखवलं नाही. बहुधा असली थेरं पहिल्यांदा करत असावा तो. फोटो काही जमले नाही, त्यासाठी ट्रायपोड आणि रिमोट लागत होतं, जे आमच्याकडे नव्हतं. नाराने घाई करून मला तिथून काढलं. रूमवर येऊन गाढ झोपी गेलो.

सकाळी जाग आली, आणि ११ वाजता चेक आउट करायचं होतं. अंघोळ करून झाली, नाश्ता केला, समुद्रावर जाऊन थर्डक्लास फोटो काढून आलो, आणि चेक आउट केलं. पण आज रिसोर्टवाला जरा अस्वस्थ च होता. त्याने मोबाईल नंबर लिहून घेतला. आम्ही निघालो, आणि श्रीवर्धनचा रस्ता पकडला. जाताना आम्हाला भरपूर पोलीस दिसले, वाटल गावात कुणी मंत्री आला असेल. पण लक्ष दिलं नाही आम्ही. पुढे रस्त्यावर १-२ ठिकाणी थांबून फोटो काढले. ते खाली दिलेत.





यानंतर उन वाढत होतं म्हणून न थांबता पुढे निघालो. श्रीवर्धन तालुक्यात थांबून चहा घेतला, तिथे बर्ड वाचींग केली ;) खरंच तिथल्या मुली, सुंदर आणि सुरेख. एकापेक्षा एक मुलगी चांगली दिसत होती, आणि हे नाराने सुद्धा एक्सेप्ट केलं. सुंदर म्हणजे "माल" अश्या नाही, पण छान!

शेवटी आमच डेस्टीनेशन आल. हरिहरेश्वरला मंदिरात जाऊन देवदर्शन केल, आणि फोटोसेशन. फोटो खाली दिलेत.








हरिहरेश्वरला खूप थकलो होतो आम्ही, तिथून थेट दिवेआगर गाठलं. तिथे आल्यावर पोटपूजा करावी म्हणलं तर एकही हॉटेल चालू नाही. चौकशी केली, तेव्हा दुर्दैवी घटना कळाली की कालच्या रात्री (म्हणजे ज्या दिवशी आम्ही तिथे होतो) गणेश मूर्ती चोरीला गेली, आणि त्यात एकाचा दुर्दैवी अंत झाला. हॉटेल वाल्यांशी गप्पा मारल्या तेव्हा ते खूप नाराज वाटत होते. दिवेआगरच मुख्य आकर्षण हरवलं होतं, त्यांचा देव कुणी चोरला होता. म्हणून त्यादिवशी म्हसल्यापर्यंतची बाजारपेठ बंद होती. आम्ही उपाशीच निघालो. आता उन्हाचा पारा वाढला होता. चटके लागत होते. तरीही न थांबता मुळशी पर्यंत आलो, आणि एक रम्य नजारा दिसला.



इथून जे निघालो, ते थेट रूमवरच.
तर असा हा आमचा प्रवास.

नोट: काही फोटोवर pk photography असं लिहिलेलं नाहीये, तरीही कॉपी करू नयेत.

धन्यवाद,
-पी.के.

Thursday, March 15, 2012

मला माहित आहे न!

मागच्या वर्षी २९ मे ला आमच्या दिन्याच लग्न होतं. दिन्या म्हणजे ऑफिसमधल्या जिगरी दोस्तांपैकी एक. दिन्या म्हणजे मितभाषी, म्हणून त्याचे ऑफिसमध्ये जास्त मित्र नाहीत. जे कोण आहोत ते आम्हीच समजा. तर त्याने आम्हाला आवर्जून आमंत्रित केलं. लग्न होतं त्याच्या गावी, म्हणजे सटाणा, ते आहे इथून ३००-३५० कि.मी. आमचे बाकी मित्र फुल आळशी, कुणी तयार होत नव्हतं. बर, बाईक वर जाव म्हणलं तर मला रोड माहित नाही, आणि पंक्याला रोड माहित तर तो त्याच्या घरी गेलेला.

कसं बसं नारा, निल्या, महेश बाबू, अमृता, दर्शन आणि स्नेहल तयार झाले. बर, त्यांनी कधी हो म्हटलं? तर आदल्या रात्री! धांदल उडाली, आणि मला कार बुक कराव लागली, नशीब ऐन वेळी भेटली एक कार. त्या रात्री मी आणि पटेल उशिरा पर्यंत बसलो, आणि सकाळी ३:३० ला इथून आम्हाला निघायचं होतं. आता उशिरा पर्यंत बसल्या मुळे मी काही जाण्याच्या स्थितीत नव्हतो. पण तरीही निघालो. सोबत फोटो काढायचे म्हणून केमेरा घेतला.
एकंदरीत प्रवास मस्त झाला, लग्न आटोपलं, आणि परतलो. आता दिन्याच्या भावाचं लग्न आहे, आणि त्याने आम्हाला बोलावलं. पण ह्या वेळेस खरंच जाणं अवघड आहे. हा विषय निघाला होता, आणि आमच्या ऑफिसचा एक बहाद्दर, ज्याला नेहमी आपलीच लाल करून घ्यायची सवय आहे तो कोकलला. तू दिन्याच्या लग्नाला गेला नव्हता न?
मी- गेलो होतो बे.
तो- मला माहित आहे न, तू गेला नव्हता!
मी- गप ए, तुला काय माहित?
तो- खोटं बोलू नको. मला माहित आहे तू गेला नव्हता.

हे त्याचं पहिल्यांदा नव्हतं. तो नेहेमी प्रत्येक गोष्टीत टांग अडवतो, किंवा आपला मोठेपणा सांगतो आणि आपली लाल करतो. बरेच वेळेस आम्ही सहन करून घेतो, पण कधी कधी पारा चढतोच. तसा काल पण चढला.

मी- अरे मादर**, गाडी मी बुक केली, सगळ्यांना मी बोलावलं, केमेरा माझा, फोटो मी काढले, लग्नात त्याच्यासोबत १०-१५ फोटो आहेत माझे, आणि मी खोटा? मी गेलो नाही हे प्रूव करण्यात तुला एवढा का इंटरेस्ट?

शेवटी पंक्याने त्याला फेसबुक वर फोटो दाखवला, आणि हा गार झाला.
तर असा हा स्वभाव. अशी मानसं तुम्हाला पण भेटतच असतील की. तुम्ही कसं ट्रीट करता त्यांना?


-पी.के.