Wednesday, June 12, 2013

नवीन सिरीज

काहीतरी खरडून खूप दिवस झाले, आणि खूप दिवसांनी थोडा वेळ मिळाला. बकबक करायला यापेक्षा चांगला मुहूर्त नाही म्हणून सकाळपासून विचार करत होतो की काय लिहाव. तेवढ्यात बाजूच्या कॉम्प्यूटरवर नजर गेली. कुणीतरी गेम खेळतंय, आणि गेम मधल्या पात्राला (character) कुत्रं चावतंय. चावण्यावरून पोस्टसाठी लागणारा विषय मिळाला. 

मागील काही महिन्यात रूमवर भरपूर घडामोडी झाल्या. वादळी पण म्हणू शकता. जुन्याच मित्राची नव्याने भरती झाली. म्हणून वादळ आले. सध्या वादळ निवळलय, म्हणून पोस्ट लिहिण्याएवढा वेळ आहे. 

असो, तर हा जो कार्यकर्ता आहे तो मूवी, सिरीजचा फार दिवाणा. एखादी मूवी पाहायसाठी कुणी तयार असो वा नसो, हा एकटासुद्धा जाइल एवढं डेडिकेशन! मागे याबाबतीत बोललोच आहे, आणि हे ही सांगितलेलंच आहे की मी या बाबतीत किती इंटरेस्टेड असतो. 

जेव्हा ह्याची एन्ट्री झाली तेव्हा त्याने आम्हाला सगळे सिरीज नीट समजून सांगितले.
१. प्रिजन ब्रेक 
२. शेरलॉक 
३. ट्वेंटी फोर (२४)
४. टू एंड हाफ मेन 
५. फ्रेंड्स 
६. हाऊ आय मेट युअर मदर 
७. स्मॉल विल 
८. डेक्सटर

अजून  बरेच आहेत पण मला आत्ता आठवत नाहीत. पहिली वेळ होती म्हणून आम्ही मन लावून ऐकलं. पण हा कार्यक्रम रोजचाच झाला! 

टी. वी. लावलीय आणि आम्ही काही बघतोय, तेवढ्यात अचानक फ्रेंड्स किंवा तत्सम सिरीज मधला जोक सांगायचा. किंवा टी. वी. वर काही दिसलं की लगेच पूर्ण हिस्टरी सांगायची. हिरो कोण होता, आधी काय करायचा, त्याला मूवी कशी मिळाली, मूवी नंतर काय झालं. लगेच विषय देवांकडे वळवायचा - Michael Jackson, Kurt Cobain किंवा सचिन तेंडूलकर. हे भली मोठी हिस्टरी चालू. 

प्रत्येक नवीन आलेल्या मित्राला त्याने पाहिलेल्या सिरीजची के. टी. दिलीच पाहिजे. मग सुरु होतं- कोणत्या सिरीजचे किती सीजन आलेत, ह्याने किती पाहिलेत, प्रत्येक सिरीजचा प्लॉट काय आहे, इ. 

परवा मला राहावलंच नाही, आणि मी त्याला सजेशन दिलं. आमच्या रूमवर एक व्हाईट बोर्ड आहे. मी त्याला म्हनल - की तुझे सगळे सिरीज यावर लिहून ठेव. कुणाचे किती इपिसोड, आणि काय काय ते डिटेल लिही. म्हणजे आम्हाला कधी कन्फ्युजन झालं तर लगेच वर पाहून लिंक लावता येते ;)


मागे एकदा चुकून बोललो की "Man of Steel" साठी आयमॅक्सला जाव काय की. हा तेच घेऊन बसला! तिकीट बुक करू का? तिकीट बुक करू का?
अरे भाई, मागच्या वेळी कारमधून गेलो होतो मुंबईला. या वेळी कार नाहीये! आणि एकाच दिवसात गर्मीने एवढा त्रस्त झालो होतो, की नंतर कधीच इच्छा होणार नाही मुंबईला जायची!
आणि आता तर पावसाळा लागलाय! मूवी पाहून पोहत पोहतच याव लागल पुण्याला ;)

नाही! तरी आयमॅक्स मधेच पहायचा! मग त्यासाठी बेंगलोरला पण जाईन ;)

तर वादळी घडामोडी इथेच संपतात. खरं तर लिहिण्यासारखं बरंच आहे, पण क्युबिकल मध्ये काम येताना दिसतंय म्हणून लगेच आटोपतं घेतोय :)

रामराम!

-पी. के.

Wednesday, April 24, 2013

गाण्यातली एनर्जी

कडक उन्हाळा पडलाय आणि ऑफिसमधून दहादा खाली जाण्याच्या आमच्या सवयीमुळे अंगाची काहिली झाली. ऑफिसचा ए. सी. जेमतेम थंडावा देतो, आणि त्यातच कसंबसं आयुष्य निघतंय, अशी गोष्ट झाली!

अंधारात आशेचा किरण दिसावा त्याप्रमाणे हा विडीओ दिसला आणि खणखणीत एनर्जी आली 


विडीओ :- रंग्याकडून साभार!

हे गाणं मला ५ वर्ष झप्पकन मागे घेऊन गेलं, आणि कॉलेजच्या gathering ची आठवण आली. त्यावेळीही मी असंच एनर्जेटिक गाणं ऐकलं होतं. गायकाने माईक हातात घेऊन "नीले नीले अंबर पर" म्हटलं आणि मी आणि भैरोसिंग एवढे उत्साहित झालो की आम्ही ५०  उठ-बशांचा एक सेट मारला! एम. जी. एम. च्या लोकांनी वाटल्यास gathering चा विडीओ पाहावा, खरं की नाही ते पटेल ;)

आजही तशीच गोष्ट घडली. ह्या गाण्यातला आवाज मला एवढी एनर्जी देऊन गेला की ती एनर्जी डीसीपेट करण्यासाठी मला ५० पुश-अप्स माराव्या लागल्या (उठ-बशा जरा कॉमनच झाल्यात म्हणून). क्षणभरासाठी विसरून गेलो होतो की आपण ऑफिसमध्ये आहोत. ज्यावेळी हातांना कळ आली, आणि एनर्जी संपली त्यावेळी उठून उभा राहिलो आणि पाहतो काय! टीम गोळा झाली!!

तर मित्राचे नाव न डिस्क्लोज करता त्याला त्रिवार अभिवादन करतो आणि वटवट बंद करतो!

-पी. के. 

Monday, March 18, 2013

चौधरी

सारी दुनिया देख दंग, ताकत और अकल की जंग… 
देसी रंग और देसी राग, कम्प्युटर से तेज दिमाग… 
अकल की खेती हरी भरी, बात सुनाउ खरी खरी… 
चाचा चौधरी 

(वरच्या चार ओळी निखिल जोशी कडून साभार)

हर्षद चौधरी म्हणजे माझा लई जुना मित्र. प्रतिभा निकेतन शाळेपासून त्याची आणि माझी ओळख. शाळा झाल्यावर अकरावी आणि बारावी आमचं कॉलेज चेंज झालं, पण नंतर इंजिनियरिंगला परत सोबतच आलो. 

आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये चौधरी शांत माणूस. जास्त बोलणं नाही, बडबड नाही, थिल्लरपणा नाही. राहणीमान एकदम व्यवस्थित. कपडे टाईम टू टाईम धुतलेले, धुतल्यावर लगेच इस्त्री करून ठेवलेले, आणि इस्त्री झाली की पेटीत भरून ठेवलेले. 

बाय द वे, पेटी उचकने आणि वरचे कपडे खाली आणि खालचे कपडे वर ठेवणे हा चौधरीचा छंद! तसा चौधरी वीकेंडला आमच्यासोबत नसतोच, गुणी बाळासारखा सगळ्या नातेवाईकांना भेट देऊन येत असतो. पण चुकून एखादा वीकेंड रूमवर घालवावा लागला, आणि करमत नसेल तर चौधरी लगेच bag कडे पळतो आणी उचका उचकी सुरु!

चौधरीला तशी मोबाइल किंवा हाय टेक वस्तूंची हौस नाही. आपला जुनाच नोकिया फोन वापरत असतो, आणि त्याचा वापर सुद्धा लिमिटेडच. फार फार तर कॉल करणे किंवा एसएमएस करणे, इंटरनेट तर फार दूरची गोष्ट. एके दिवशी चौधरी असाच माझ्याकडे आला आणि म्हनला 'अबे, फोनची बेटरी गेली वाटतं! खूप लवकर डिस्चार्ज व्हायला' मी म्हणलं लवकर म्हणजे किती? '२ दिवसात एकदा चार्ज कराव लागायले'… तर असा धन्य कार्यकर्ता!

चौधरीला आमच्यासारख्या लांब पल्ल्याच्या ट्रिप्स झेपत नाहीत, लोहगड सोडला तर मला तरी नाही आठवत की चौधरी आमच्यासोबत कुठं आलाय (बाय द वे, लोहगड म्हणजे लांब पल्ला नाही). चौधरीची गाडीपण व्यवस्थित ठेवलेली असते, मला वाटत की तीच गाडी शोरूम मध्ये ठेवली असती तर खराब झाली असती, पण चौधरी नियमित काळजी घेतो म्हणून आजपर्यंत टिकून आहे, आणि गाडीची फायरिंगसुद्धा जशीच्या तशीच आहे! नाहीतर आमच्या गाड्या पहा, रोज वापरात असून सुद्धा धूळ खात पडलेल्या असतात आणि निष्काळजीपणाच्या चालवण्याने इंजिनची माय-बहिण झालेली आहे ;)

घरचं जेवण चालू असतानाच चौधरींनी ढेरी कमावली आहे, आणि आता झिजवायचा प्रयत्न चालू आहे. म्हणूनच चौधरींचं जेवण एकदम मोजून मापून. त्यातल्या त्यात जिममध्ये हाड मोडेस्तोवर व्यायाम, पण परिणाम शून्य!

बर, बाकी पोट्टे ऑफिसला जाताना जीन्स, टी-शर्ट घालतात. पण चौधरी प्रॉपर फ़ोर्मल कपडेच घालून जातात. दर दोन दिवसाला शेविंग केलीच पाहिजे, नख कापलेच पाहिजेत, बुटांची पॉलीश केलीच पाहिजे! चष्म्याची व्यवस्था गाडीतच! गाडीच्या बॉक्समध्ये गॉगल आणि साधा चष्मा सापडायलाच पाहिजे. दिवसा गॉगल वापरायचा आणि संध्याकाळी येताना साधा चष्मा वापरायचा हे ठरलेले नियम!

महत्वाची गोष्ट म्हणजे चौधरीचा दिमाग लई तल्लख, कुठलीही गोष्ट त्यांना एकदा सांगितली की ती झालीच म्हणून समजा! मग ते दुकानातून कुठलं सामान आणणं असो, की चतुर्थीला गणपती मंदिरात जाणं असो. चौधरीला सगळं लक्षात राहतंय. यावरून आठवलं, चौधरी गणपतीचा निस्सीम भक्त! दगडूशेठ गणपतीला नियमित वारी असतेच, पण समजा चतुर्थी वीकडेला आली आणि जाणं झालं नाही तर कमीतकमी गल्लीतल्या गणपतीचं दर्शन घेऊनच येतो.

एटीएम आणि चौधरींची खूप दुष्मनी. चौधरी सहसा स्वतःसोबत एटीएम कार्ड ठेवतच नाहीत. महिन्याच्या सुरुवातीला एकदाच एटीएम मधून पैसे काढायचे हा उसूल!

डक्क्या सारख्या पोराला आम्ही बोलतं केलं, पण चौधरी लई अवघड माणूस! तसा चौधरी कधी कधी गप्पा मारतो, पण लई क्वचित. सहसा त्याचा बोलायचा मूड असेल तरच गप्पा चालतात, नाही तर टीवी लावून बातम्याच बघतो.

चौधरी पुराणात इतकंच! चौधरींचा एक फोटो चिकटवून ४ शब्द संपवतो!
-पी. के. 

Friday, March 8, 2013

बारकं

रेल्वे स्टेशन आणि रेल्वे जंक्शन मधला फरक माहिती आहे? सेम तसंच बारकं म्हणजे आमच्या ग्रुपचं जंक्शन आहे. नाव- संदीप पोकलवार. 

मागच्या पोस्टमध्ये सांगितल्या प्रमाणे डक्क्या आणि माझी भेट सेकंड इअर मध्ये झाली, आणि त्याबरोबर बारक्याची पण ओळख झाली. डक्क्या आणि बारक्या शाळेच्या पहिली पासूनचे दोस्त. फक्त ११वी आणि १२वी वेगळ्या कॉलेजमध्ये शिकले, आणि परत इंजिनियरिंगला एकत्र आले!

साहजिकच माझी आणि बारक्याची ओळख झाली, पण सेकंड इअरला ओळख मर्यादितच होती. याचं कारण म्हणजे बारक्याचा ग्रुप. त्यावेळी बारक्या अजीब कार्यकर्त्यांसोबत राहायचा, त्यांना असाइनमेंट, प्रोग्राम्स शेअर करणे म्हणजे संपत्ती शेअर करण्यासारखं वाटाव, इगो पण हर्ट व्हाव त्यांचा. 

थर्ड इअरला इलेक्टीव चूज करायचा होता, तेव्हा माझ्यासोबत मोजकेच पोट्टे होते आणि बारक्या त्यातला एक. डी. आय. पी. विषयाला मी, बारक्या, निख्या आणि श्रीकांत्याच! बाकी ५० लोक दुसऱ्या सब्जेक्टला! क्लासमधला धिंगाणा वाढला आणि बारक्या आमच्या ग्रुपमध्ये शामिल झाला. आता प्रोग्राम्स, असाइनमेंट आमच्या सोबत होऊ लागल्या. तरी अधून मधून त्याची वारी असायचीच जुन्या ग्रुप सोबत, आणि जुने कार्यकर्ते काड्या करायचेच. 

असो, बारक्या राहायचा भाग्यनगरला आणि जंक्शन झाल्यामुळे आम्ही सगळे रोज तिथल्या गणपती मंदिरात जमा व्हायचो. कॉलेज सुटायचं ५-६ वाजता, आणि घरी जाउन थोडी पोटपूजा झाली, की भाग्यनगर गाठून बारक्याच्या दुकानासमोर उभं राहायचं. आम्ही गोळा झालेले पाहून बारक्या काम आटोपायचा, आणि जमावात शिरायचा. तिथून एकेकाला फोन लावणे चालू. श्रीकांत्या, अज्या, भैर, चौधरी, गज्या, पर्तान्या सगळे यायचे. गणपतीचे दर्शन घेतले, की आज काय घडलं, काय लफडे झाले चर्चा चालू व्हायची. 

बारकं तसं लई नंबरी होतं. प्रत्येक पोराला त्याने एका पोरीचं नाव चिकटवलं, आणि रोज चिडवायचं. स्वतः मात्र सेफ साईड होतं. पण आम्हीही काही कमी नव्हतो, आम्ही पण नंबर १ नाव शोधून काढलं आणि बारक्याला जोडलं ;) जेव्हा त्याने आम्हाला चिडवायला चालू केलं तेव्हा आम्ही पण चालू व्हायचो. 

बारक्या क्लासमध्ये सहसा आमच्याच बाजूला बसायचा. ते बाजूला बसलंय म्हणल्यावर क्लासमध्ये काड्या चालू झाल्याच म्हणून समजा! मग बेंचवर बसलेल्या एखाद्याला हसू आवरलं नाही, की झालं! क्लासमधून हकालपट्टी झाली की बारकं नंतर येउन भेटायचं आणि परत चिडवणं चालू :)

फायनल इअरला बारक्याची आणि माझी दोस्ती चांगलीच वाढली. बारक्याला डी. आय. पी. चाच प्रोजेक्ट करायचा होता, म्हणून ते श्रीकांत्यासोबत जॉईन झालं, पण तरीही कोडींग साठी आम्ही सोबतच बसाव! त्यावेळी निख्या आणि श्रीकांत्याची हाणामारी आम्ही दोघांनी लई एन्जॉय केली :) 

होळीच्या दिवशी बारकं सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन माझ्या घरी आलं. नांदेडच्या पोरांची होळी म्हणजे कपडे फाडलेच पाहिजेत! घरातून बाहेर पडताच बारक्याने आणि आत्याने माझे कपडे फाडले आणि तोंडाला रंग फासला. तिथून आगेकूच करत आम्ही डक्क्याच्या घरापुढे गेलो, पण आमचा अवतार पाहून डक्क्या घराबाहेर आला नाही. आमचा ताफा जसा तरोडा नाक्या पर्यंत पोचला, तसं आम्हाला पोलिसांनी हटकलं, आणि गाड्या ताब्यात घेतल्या. गज्या, आत्या आणि बाकी पोट्टे पोलिसांना हुज्जत घालत होते, आणि एव्हाना तिथले चिल्लेपिल्ले येउन गोंधळ घालत होते. पोलिसवाला चिडला, आणि आम्ही थोडं दूरच जाव म्हणून पळालो. पण बारक्याला काय वाटलं कुणास ठाऊक, ते तिथंच थांबलं. पोलिसाचा पारा चढला आणि पळता पळता फाडकण आवाज आला. काय झालं म्हणून आम्ही मागे पाहतोय तर बारक्या गालावर हात ठेऊन पळत येताना दिसलं :) काय झालं ते विचारायची गरज नव्हतीच :)

पर्तान्या आणि बारक्या बरेच जिगरी दोस्त. पर्तान्या नेहमी ट्रेनने सेलू-नांदेड येरझाऱ्या घालायचा, आणि नेहमी फुशारक्या मारायचा की ट्रेनचे सगळे टी. सी. त्याच्या ओळखीचे आहेत. एकदा असंच बारक्याला इंटरव्यू निमित्ताने औरंगाबादला जायला लागलं, म्हणून त्याने सेलूच्या सेहवाग (परतान्या) सोबत जायचं ठरवलं. जनरल डब्यात गर्दी होती, म्हणून परतान्या त्याला रिजर्वेशनच्या डब्यात घेऊन गेलं आणि म्हणे तू काळजी करू नको बारक्या! मी आहे न!

बारक्याला वाटलं आता टी. सी. आल्यावर परतान्या काहीतरी जुगाड करेल, आणि आपल्याला बसायला मिळेल. कशाचं काय, रात्र भर परतान्याने त्याला ह्या डब्यातून त्या डब्यात करायला लावलं! मग काय! २ दिवसांनी पर्ताण्याच्या उद्धारच केला बारक्याने :)

कॉलेज लाईफ संपली, आणि पुण्यात जेव्हा आलो तेव्हा बाकी पोरांची आणि माझी ओळख जास्त नव्हती. मला रूम भेटली ती बारक्या मुळेच. मी, बारक्या, निख्या, श्रीकांत्या, ओम्या, आत्या, अवधूत रूम पार्टनर बनलो. 

त्याने मला बरेचदा चुना लावला. माझ्यासोबत गाडीवर बसायचा आणि एखादा सिग्नल आला, की म्हणायचा-- "चल बे, इथं पोलिस नसते, काढ गाडी"… आणि गाडी काढली, आणि पोलिसाने पकडलं की साईडला जाउन दात काढायचं… 

रूमवर सगळ्यांशी त्याची जमायची… खासकरून ओम्या आणि आत्यासोबत. एकदा असंच आत्याला काहीतरी हुक्की उठली आणि घरीच जेवायला बनवावं म्हणून बसला. आत्याच्या प्लान म्हणजे 'कशात काय आणि फाटक्यात पाय'! तेवढ्यात बारकं हात हलवत आलं आणि बोम्बललं -- "आपण तर फक्त वेजच खाणार"… आत्या आणि ओम्या लोळू लोळू हस्ले… आजही आत्याचा फोन आला तर एकदा तरी आठवण करून देतेच ते… 

मागे सांगितल्याप्रमाणे एका वर्षानंतर भैरोसिंग आमच्या रूमवर पाचारण झाले, त्यानंतर बारक्या आणि भैरोसिंगाच्या हसण्याला उधाणच आलं. रूमवर एखादी घटना घडली, की दोघे एकमेकांकडे पहाव आणि खीखीखी कराव. 

वाई, पाचगणी, महाबळेश्वर आणि दिवेआगर ट्रीप बारक्यामुळेच पॉसीबल झाली.  बारकं होतं म्हणून ती ट्रीप एन्जॉय झाली, नाहीतर डक्क्या कुठं सोफा सोडून आलं असतं?



आता बारकं गेलंय परदेशी! कधी येतंय काय माहित!

-पी. के. 

Tuesday, March 5, 2013

डक्क्या

आमच्या टोळीतला सगळ्यात शांत आणि सुस्त प्राणी. खास बात म्हणजे शुद्ध मराठीत 'डावखुरा' माणूस, पण मराठवाडी भाषेत डक्क्या (डकन्या)! संपूर्ण नाव-- शशांक शेषराव पचलिंग. 

भैरोसिंगच्या पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे डक्क्या आणि माझी भेट सेकंड इअरच्या क्लास मध्ये झाली. डकन्याचं घर आणि माझं घर तसं जवळ-जवळच. कधी कधी डक्क्या बाइक घेऊन आला, की आम्ही दोघं सोबत घरी जाव!

घरी जाण्यावरून एक गोष्ट आठवली, गाडी विसरणे ही त्याच्या घरी सगळ्यांची सवय होती. कित्येक वेळेस माझ्या सोबत हनुमानगड पर्यंत पायी यायचा आणि मग त्याच्या लक्षात यायचं की आज कॉलेजमध्ये बाइक आणलीय! एकदा तर ट्युशनच्या समोर गाडी विसरली, ती दुसऱ्या दिवशी सकाळीच आणली!!

अनुवांशिक कंटाळ्यामुळे ह्याला "C प्रोग्राम्स" करणे जड जायचे. आणि त्यावेळी माझ्याकडे कॉम्प्युटर नसल्यामुळे मी याच्या घरी जाउन बसाव, आणि दोघं मिळून प्रोग्राम्स बनवाव. असं करत करत आमची दोस्ती वाढली. हाच कंटाळा इलेक्ट्रोनिक्स च्या practicals मध्ये पण दिसून यायचा आणि तिथं सुद्धा डक्क्या माझ्या सोबतच राहायचा म्हणजे ब्रेडबोर्ड ला हात लावायची गरज पडू नये :)

कुठं काय बोलाव, याची डक्क्याला बिलकुल अक्कल नव्हती. एके दिवशी मास्तरने भैरोसिंग आणि बिल्डरला फैलावर घेतलं आणि विचारत होता की कोण कोणाच्या फाईल्स कॉपी मारतो. दोघांनी तोंडावर शिलाई मारली होती, म्हणून मास्तरने डक्क्याला पाचारण केलं. डकन्या काय बोम्बलला असेल? "सर, मला काही माहित नाही, मी प्रसादची फाईल कॉपी मारतो". घ्या. आमचीच लागली, ते पण विनाकारण!

डक्क्या तसा कमीच बोलतो, पण त्याला बोलतं कराव लागतं. एकदा बोलता झाला, की मग काही नाही! आमच्या केटेगरीमध्ये मिक्स होऊन गेला. अधून मधून एखाद्याची घ्यायला त्याला लई आवडावं. असंच एकदा गज्या सुट्ट्यात घरी गेला होता आणि प्रोजेक्ट टायटल सबमिट करायचं होतं, त्यावेळी त्याने गज्याची फुल घेतली. झालं काय, की गज्याला फोन केला डक्क्याने आणि गजा गाऱ्हाणे करू लागला माझे. आणि डक्क्या सगळा तमाशा मजा घेत पाहू लागला.

हं, अजून एक गोष्ट. डक्क्याच्या घरच्यांनाही माहित पडलं होतं की कॉलेजमध्ये ह्याला 'शशांक' ऐवजी 'डक्क्या' म्हणून बोलावतात. आणि ह्याच्या वडलांचा आणि ह्याचा आवाज एकदम सेम. त्यावेळी डक्क्या कडे मोबाइल नव्हता आणि घरच्या फोनवर कॉल लावाव लागायचा. ह्याच्या वडलांनी जरी फोन उचलला तरी डक्क्याच वाटायचा.
आम्ही पोट्टे--"हेलो डकन्या?"
डक्क्याचे वडील -- "अरे छोटू? तुझा फोन आलाय!"

हां, तर प्रोजेक्ट वरून आठवलं….  डक्क्या आणि रंग्याचं घर जवळ जवळ होतं. एके दिवशी 'रियाज' करायला भारग्या रंग्याकडे गेला, जाता जाता डक्क्याला पण सोबती म्हणून घेतलं. त्या दिवशी डक्क्याने रंग्याचा प्रोजेक्ट पाहिला आणि फुल पागल झाला. अबे प्रसाद्या, आपण सेम प्रोजेक्ट करुत, फक्त युआय चेंज करुत म्हणजे जास्त काम लागणार नाही. त्याला अंदाज सांगितला की तू जे म्हणतोय ते तेवढं सोप्प नाही, नुसता युआय जरी चेंज करायचा म्हनला तरी पूर्ण प्रोजेक्टची कोडींग चेंज होते. त्यातल्या त्यात आपल्याला डेटाबेससुद्धा चेंज करायचाय… पण आळशीपणापुढे माझं काहीही चाललं नाही, आणि सेम प्रोजेक्ट करावा लागला, उलट सगळी कोडींग नव्याने करावी लागली!!

कॉलेज संपल्यावर (डिग्री मिळाल्यावर) डक्क्या आमच्या सोबत राहू नये, त्याच्या भावाचं स्वतःचं घर होतं इकडे. आमच्या रूम आणि डक्क्याच्या घरातलं अंतर फार फार तर १० किमी असेल, पण तरीही डक्क्या काही भेटायला येऊ नये. एकवेळ प्रार्थना केली तर देव अवतरेल, पण डक्क्या कधीच यायचा नाही… एवढा कमालीचा आळस!!

आमच्या कार्यकर्त्यांनी खूप स्ट्रगल केलं, सेम तेवढंच डक्क्याने केलं आणि मग नोकरी मिळाली. आता आम्ही रूम चेंज करून डक्क्याच्या शेजारीच राहायला गेलो. एव्हाना डकन्याचा भाऊ ऑनसाईट गेला, आणि डकण्याच्या हाती कार लागली. मग काय! महाबळेश्वर, वाई, दिवेआगर, लोणावळा, मुंबई अश्या ट्रिप्स नेहमीच व्हायला लागल्या. भैऱ्याच्या भाषेत 'डक्क्या आपल्या नादी लागून बरबाद झालंय ;)'

एवढी मर मर करून आत्ता कुठं डकनं बोलतं झालंय! उदाहरण म्हणजे मी आणि डक्क्या कधी फिरू लागलो आणि एखादी पोट्टी समोरून गेली तर ते स्वतःहून तारीफ करायला लागलंय ;)

त्याची खासियत म्हणजे डिस्ट्रीक्ट लेवलचा क्रिकेट प्लेयर होतं ते. नांदेड-पुणे, नांदेड-औरंगाबाद असं खेळून आलय. पण काय माहित, आम्हाला कधी त्याचा गेम दिसलाच नाही. कधी पण कॉलेज मध्ये मेच असली की साला हरूनच यायचा. त्याला याच्या वरून कित्येकदा चिडवतो आम्ही… मुद्दाम 'अंडर-आर्म' बॉलिंग करून त्याला आउट करायचं आणि मग चिडवायचं :)

डक्क्या म्हणजे दुनियेचा किरकिरी माणूस! कित्येक दिवसांपासून गोवा जायचं आमच्या मनात आहे, पण हा काही आम्हाला नेत नाही. एवढ्या लांब कोणी कार चालवावी? मला बोर होतंय!
बर, आम्हाला शिकव, आम्ही अधून मधून चालवतो … नाही! मी भावाला सुद्धा कार चालवायला देत नाही!
मग जायचं कसं?

गाणे ऐकायचेत? तर फक्त वोकल सॉंग पाहिजेत! जास्त म्युजिक नको!!
कार चालवताना लोक सहसा दणादण गाणे वाजवत चालवतात… कोणाला आवडतात म्हणून, आणि कुणी झोप येऊ नये म्हणून… पण याला मंद गाणे आवडतात… इकडे लोकांचा जीव जातो, कुठे ह्याला झोप लागली, तर विनाकारण जीव जायचा!

मागे एकदा दिवेआगरला जाताना स्टीअरिंग वरून दोन्ही हात सोडून डोक्यामागे नेऊ लागला. शेवटी राजाला राहवलं नाही, आणि ते म्हणलं -"डक्क्या काही काम असाल तर सांग, स्टीअरिंग वरून हात सोडू नको! मला इकडे मागे काहीही काम नाही, जे म्हणशील ते करतो ;)"





अजूनसुद्धा डक्क्या वीकेंडशिवाय भेटत नाही. घर जवळ असून सुद्धा त्याला सोफ्यावरून उठाव वाटत नाही. ऑफिसवरून आला, की जे सोफ्यावर बसून टीवी चालू करतो, ते रात्री ११ -११:३०  पर्यंत! मध्ये फक्त जेवणाचा व्यत्यय येतो, ते पण सोफ्यावरच उरकून घेतलं जातं!

बरं, वरचा फोटो पाचगणी जवळ काढलाय. तसं डकन्याला फोटो काढून घ्यायची हौस नाही (जशी भैरोसिंघांना आहे), पण अधून मधून मिरर मध्ये स्वतःचे केस पाहतो, आणि डाव्या हाताने "आउ आउ" म्हणत नीट करतो, आणि पळत जाउन एखाद्या स्पॉटवर बसतो. "प्रसाद्या, एक फोटो काढ बे!". आणि लगेच क्लिक!

 तर असा हा कार्यकर्ता…

-पी. के. 

Thursday, February 28, 2013

भैरोसिंग (बंटी)

बंटी म्हणजे आमच्या ताफ्यातला मोठ्ठा प्राणी. पूर्ण नाव-- यशवंत जीवनराव देशपांडे. 
खूप दिवसांआधी यांच्या नावाने एक पोस्ट टाकली होती, पण त्या वेळी याचं वर्णन अतिशय कमी शब्दांत झालं होतं. खरं तर यांच्या देहयष्टीच्या मानाने तेवढी छोटी ब्लॉग पोस्ट म्हणजे लज्जास्पद ठरेल, म्हणून परत एकदा व्यक्तीवर्णन!

बंटीचं मूळगाव अजून कुणालाही ठाऊक नाही, ते एक न समजणारं कोडं आहे. हिंगोली, वसमत, नांदेड, की यमलवाडा यावरून सगळ्याचं दुमत होतं. बंटी सांगायचा प्रयत्न करतो, पण प्रत्येक वेळी कोडं तितकंच किचकट होत जातं, म्हणून आम्ही याविषयी अति विचार करणं सोडून दिलंय. 

बंटीची आणि आमची ओळख फर्स्ट इअर पासून. एकदा असंच कॉलेजच्या कोरीडॉरमधून फिरत असताना बंटी पळत आला, आणि फ्रेशर्स पार्टी मध्ये येण्याचं आमंत्रण देऊ लागला. १-२ दिवसांनंतर भार्ग्या कडून कळलं की बंटी त्याच्या सोबत एन. एस. बी. कॉलेजमध्ये होता. फर्स्ट इअर मध्ये त्यानंतर बंटीचा आणि आमचा जास्त काही संपर्क नाही झाला. 

सेकंड इअरचे डिजिटल इलेक्ट्रोनिक्स आणि बेसिक इलेक्ट्रोनिक्स म्हणजे बंटी आणि टोळीची दुखती नस. भार्ग्या च्या ओळखीमुळे डक्क्याची आणि माझी दोस्ती जमली, आणि तो माझ्यासोबत बसायचा, आणि त्यामुळे बंटीभाऊ आणि टोळी आमच्यासोबत चिकटली. त्यावेळी बंटीभाऊ सोबत बिल्डर घेऊन फिरायचे, म्हणून कॉलेजमध्ये एक 'दरारा' असायचा. वर्गात आणि   Practical मध्ये विनाकारण खी-खी करणे ही या टोळीची खासियत. यांच्यामध्ये बाजीराव सुद्धा शामिल होते. 

दरम्यान, बंटीला एकदा कानाचा आजार झाला आणि कमी ऐकू यायला लागलं. बंटीचं 'भैरोसिंग' असं  नामकरण व्हायला एवढं कारण पुरेसं होतं. त्यानंतर बंटीने बरेचदा सिद्ध करून दाखवलं की त्याला खरंच बहिरेपण आलंय. मग ते मोबाईल ऐकू न येणे असो, की ड्रील मशीनचा आवाज विमानासारखा वाटणे असो. 

सेकंड इअर च्या शेवटी ही टिंगल टवाळी बंटी आणि बिल्डरला महाग पडली, आणि तीन-चार विषय घालून एक वर्ष घरी बसले. बंटी म्हणजे एवढी प्रसन्नमूर्ती की, आपलं वर्ष गेलंय त्याच्या दुःखापेक्षा शत्रूचे १-२ विषय घातले याचं त्यांना समाधान! त्यात कहर म्हणजे बंटीभाऊंनी लेक्चररसोबतच्या एका भांडणात नाहक आम्हाला अडकवल होतं :) आम्ही साफ सुटलो, पण बंटी पुरता अडकला होता. 

असो, एक वर्ष कम्प्लीट झालं आणि बंटी परत कॉलेजमध्ये रुजू झाला. नवीन मित्र भेटल्यामुळे बंटीचा आणि आमचा संपर्क तसा तुटलाच. पण मी रोज भाग्यनगरची वारी करायचो म्हणून बंटी अधून मधून भेटायचा. पण टी. वी. च्या अतूट प्रेमापोटी तो आमची भेट बरेचदा टाळायचा. बालिका वधू आणि तत्सम 'सास-बहु' सिरिअयल्स म्हणजे त्याचे फेवरेट कार्यक्रम. अजूनही त्याला सगळ्या पात्रांची नावं तोंडपाठ आहेत. 

आमचं कॉलेज जीवन संपलं आणि आम्ही नोकरी निमित्ताने पुण्याला आलो. अधून मधून बंटी आम्हाला फोन करत असे. नांदेडला गेल्यावर त्याची आणि आमची भेट ठरलेलीच असायची पण इथे सुद्धा 'सास-बहु' आडव्या यायच्याच. 

बंटीने फायनल इअर डिस्टींक्शन घेऊन काढलं आणि थेट आमच्या रूमवर अवतीर्ण झाला. रूमवर आल्यावर कसून तयारी चालू झाली आणि काही महिन्यातच बंटीने नोकरी मिळवली. 

बाहेरच्या जेवणावर बंटी आधीपासूनच नाराज असायचा. जेवण घरी बनवायला सुरु केलं, आणि बंटीच्या कलागुणांना वाव मिळाला. रोज नवनवीन पदार्थ आम्हाला खायला मिळत आहेत. तसंच बंटीच्या वसमत वारीनंतर नवनवीन शब्द सुद्धा शिकायला मिळतात. 

उदा. 
१. सिनेमात एखादा इरोटिक सीन आला तर -- हिरो हिरोइनचा 'हिसाब' करत आहे. 
२. जेवण 'नंबर एक' झालंय . 
३. 'वन साईड' खाल्लं (म्हणजे खूप खाल्लं). 
४. आज 'आवताण' आहे (आमंत्रण)

मागे काही दिवसांआधी आम्ही ट्रिप्स आयोजित केल्या होत्या तेव्हा एक गोष्ट लक्षात आली कि बंटी जास्त फिरला नाही, आणि मित्रांसोबत एखाद्या ट्रीपला जाण्याची उत्सुकता त्याच्या चेहऱ्यावरून साफ दिसते. लगेच अंगाला गुदगुल्या होणे, अति एक्साईट होणे हे गुणधर्म. 

त्यातल्या त्यात कुणाच्या हातात केमेरा दिसला तर बंटी सहनशीलता सोडून फोटोसाठी तयार होतो. मग समोरच्या माणसाला फोटोग्राफी सोडून पोट्रे काढावे लागतात. मागे दिवेआगरच्या पोस्ट्स मध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल की एस. एल. आर. केमेरा असून सुद्धा मला 'नेचर फोटोग्राफी' करता आली नाही :P 

तर असा हा बंटी. अजून काही गोष्टी आहेत, त्या लिहिल्या तर बंटी हाणेल. म्हणून पोस्ट आटोपतो. 

-पी. के. 

Wednesday, February 27, 2013

निख्या

पंक्यानंतर कुणाचं नाव जास्त घेतलं असेल तर तो म्हणजे निख्या. पूर्ण नाव - निखील चंद्रकांत जोशी. 
निख्याची आणि माझी ओळख सेकंड इअरच्या पहिल्या क्लास मध्ये झाली. निख्याने फर्स्ट इअर मध्ये माती खाल्ली होती, म्हणून एक वर्ष कुत्रे मारत बसला होता आणि मग आमच्या सोबत जॉईन झाला. 

त्यावेळी आमच्या कॉलेजमध्ये इंग्रजी सहसा कोणी बोलत नव्हतं. फर्स्ट इअर मध्ये माझे जास्त कोणी मित्र नव्हते, होता तो फक्त भार्ग्या. तो गेला इलेक्ट्रोनिक्स मध्ये. मी एकटा बसलो होतो, आणि थोड्या वेळात निख्या माझ्या बाजूला येउन बसला. जे फाड फाड इंग्रजी बोलायला चालू केली त्याने… बाप रे…. आम्ही राहिलो गावठी मानसं. निख्याला काय उत्तरं द्याव! तरी कसा बसा दिवस काढला. 

नंतर नंतर निख्याने त्याचे कारनामे दाखवायला चालू केले. हातावर, अंगावर काहीबाही लिहिणे…. वर्गात पच्चकन काहीतरी बोलणे…. आणि असं काही करून लोकांच्या शिव्या खाणे हे त्याचे आवडते छंद! 

असाच एक किस्सा सांगतो- एके दिवशी निख्याच्या हातावर लिहिलं होतं-- "आज समोसा खायचा नाही". आम्ही विचारलं - "का रे भाई?" तर निख्याचं उत्तर--"आज चतुर्थी आहे. आज उपवास आहे, म्हणून समोसा खायचा नाही"
घ्या. एवढ्याश्या गोष्टी साठी अंगावर लिहून घेतलं. 

अजून काही उदाहरणं-- "आज पेट्रोल भरायचं आहे"
"आज बुधवारचा बाजार आहे".  हे कशासाठी? तर आज गाडी दुसर्या रस्त्याने न्याव लागेल. ते लक्षात राहिलं पाहिजे!

१-२ वर्षाखाली गजनी पिच्चर पाहिला, आणि लगेच निख्याला फोन लावला. अबे तू केस ठोक. त्याने तुझ्या जीवनावर मूवी बनवलीय ;)

त्यावेळी निख्या अवास्तव वादावादी करायचा. खासकरून त्रिवेदी सरच्या लेक्चरमध्ये दिसून आल्यासारखं करत होता. ऐन क्लास संपायची वेळ आली, कि ह्याला काहीतरी डाउट मिळायचे. इथंही शिव्या खाउन घेत होता, आणि त्याचं पोट भरत होतं. 

थर्ड इअर च्या आसपास त्याने अजून चाळे चालू केले. लोकांकडे बारकाईने पहायचं आणि त्यांच्या नकला मारायच्या. मग लेक्चरर कसे शिकवतात, मी फोन कसा उचलतो, श्रीकांत्या कसा चालतो, बारकं कसं चालते ते सगळं दाखवायचा. मागे मी एकदा प्रोजेक्ट बद्दल लिहिलंच होतं, तेव्हा श्रीकांत्या आणि निख्या रोज हाणामारी करून धुमाकूळ घालत होते. 

अरे हो, निख्यात आणि माझ्यात एक गोष्ट कॉमन होती. ती म्हणजे आमच्या दोघांच्या बापाचं नाव चंद्रकांत होतं, आणि दोघांचे बाप स्वभावाने जवळपास सेमच! कधी बसलो की आमचं डिस्कशन सुरु व्हायचं की सगळे चंद्रकांत नावाचे मानसं कसे सर्किट असतात ;)

इकडे पुण्यात आल्यावर निख्या रूम पार्टनर झाला, आणि रोजचाच धिंगाणा चालू झाला. मला अजूनपण आठवतंय पंखा चालू ठेवायचा की नाही यावरून एकदा मारामारी झाली होती. सांगायचं तात्पर्य हेच, की युजुअली त्याचेच बाकीच्यांशी भांडणं व्हायचे, आणि तेही क्षुल्लक गोष्टींवरून ;)

मूवी बघायचा नाद त्याच्या एवढा कोणालाच नाही. त्याला कोणाची सोबत लागायचीच नाही. शनिवार असला की ह्याने एखादी मूवी प्लान केलेलीच असायची आणि मग अलार्म लावून उठायचा. ते पण अलार्मच्या आधी उठून अलार्म कधी वाजतो त्याची वाट पहायचा :P आणि एकदा परत आला की मूविच्या पहिल्या मिनिटापासून ते शेवटच्या मिनिटापर्यंतची स्टोरी सांगितली नाही तर नवलंच!

शहाण्याने निख्याला रस्ता विचारू नये! त्याचे स्वतःचेच लेफ्ट-राईटचे कन्सेप्ट्स चुकीचे आहेत, आणि विचारणारा माणूस भरकटलाच म्हणून समजा!

एकदा आम्ही असंच बाजीरावच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुरंदर किल्ल्यावर गेल्तो. त्यावेळी त्याने अन्याची जी घेतली!!! अन्या जोरजोरात हसायचा, आणि हा तिथ सगळ्यांना सेम तसंच हसून दाखवू लागला. किल्ल्यावरचे येणारे जाणारे परेशान, हे पोरगं असं का करायले? अन्या इतका चिडला की आता निख्याला मारतोच म्हणून बसला! ;) 

पण नंतर काही दिवसांनी निख्याचा स्वभाव बदलला, आणि भयानक मनमिळावू झाला. आजच्या घडीत एकच पोट्ट आहे, जे सगळ्यांच्या संपर्कात आहे. आणि सहसा कुठल्याच गोष्टींचा राग मानून घेत नाही. काही दिवसांनी निख्या पुणे सोडून गेलं आणि बेंगलोरला स्थाईक झालं.
 
आता तिथं नवीन नाटक चालू झालेत. उगाचच अंगावर टेटू काढून घेतंय. 
पाहू, निख्या काही दिवसात पुण्याला यायची प्लानिंग करतोय. ते इकडं आलं, की परत पहिले पाढे पंचावन्न होतीलच!

-पी. के. 

Wednesday, February 20, 2013

पंक्या

माझ्या बऱ्याच ब्लॉग पोस्ट्स मध्ये मी माझ्या मित्रांबद्दल लिहिलं आहे, पण कधीच त्यांची ओळख नाही लिहिली. आता एकेक करत सगळ्या कार्यकर्त्यांबद्दल लिहावं म्हणतो. सुरुवात पंक्यापासूनच झाली पाहिजे. 

पंक्या काही कॉलेजचा दोस्त नाही, मी जेव्हा कॉलेज सोडून कंपनी जॉईन केली, त्या दिवशी पंक्याची आन माझी भेट झाली. ठिकाण होतं कंपनीचं ऑफिस-- आम्ही सगळे चोर धरून आणल्यागत उभे होतो. आमच्या कॉलेजचा मी फक्त एकटा कार्यकर्ता सेलेक्ट झालो होतो, त्यामुळे माझे कोणी मित्र नव्हते. म्हणायला तसा बंटी होता माझ्यासोबत, तो नांदेडच्याच दुसऱ्या कॉलेजमधून आला होता. 

मी आन बंटी जरा गप्प गप्पच बसायचो, पण पंक्या आणि त्याच्या कॉलेजचे बाकी पोट्टे खी-खी करायचे. आमचं इंडक्शन चालू झालं, आणि हळू हळू पोट्यांची ओळख होऊ लागली. महिन्याभराने मी कंपनीने दिलेली हॉटेलची रूम सोडली, आणि कर्वेनगरला शिफ्ट झालो. इथून येणं-जाणं श्रीकांत्याच्या बाइकवरच.

पंक्या राहतो वडगावला, आणि जाता जाता राजाराम पूल लागतो. मग पंक्या माझ्यासोबत यायचा, मी त्याला राजाराम पुलाजवळ सोडून पुढे जायचो. त्यावेळी मी जरा रिजर्व्ड टाईपचाच होतो, आणि कधी कधी रूमपार्टनरला पिक अप कराव लागायचं म्हणून पंक्याला दुसरा ऑप्शन पहाव लागायचा. 

पण नंतर मी स्वतःची गाडी घेतली, आणि पंक्याची आणि माझी चांगलीच दोस्ती झाली. हार्डली असा एखादा दिवस जायचा की मी आन पंक्या सोबत घरी गेलो नाही. ऑफिसमध्ये सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता सोबतच व्हायचा. 

ओळख झाल्यापासून थोड्याच दिवसात आम्हा दोघांना कळल की आम्ही दोघे एकाच केटेगरीचे आहोत, मग काय! रोज धिंगाणा चालू झाला, उठता बसता शिव्या चालू झाल्या. नव-नवीन शिव्या आम्ही शोधून काढायचो. कधीकधी नवीन म्हणी सुद्धा बनवायचो. मागे एका ब्लॉग पोस्ट मध्ये बोललोच की आम्ही गाण्यांना सुद्धा सोडलं नाही. 

पुण्यात नवीन असताना मी माझ्या कोलेजच्या मित्रांना प्रायोरिटी द्यायचो, पण आता पंक्या आणि बाकी ऑफिसचे पोट्टे जिगरी दोस्त बनले. पंक्या एवढा खास, की आम्ही बऱ्याच गोष्टी एकमेकांशी शेअर करायचो- घरचे प्रॉब्लेम्स, गर्लफ्रेंडचे लफडे (म्हणजे एकेरी लफडं असो, की दोन्ही बाजूने), आणि बरंच काही. 

कहर तर तेव्हा झाला जेव्हा आमचा डेस्क शिफ्ट झाला आणि आम्ही दोघे एकमेकांच्या बाजूला बसायला लागलो. आमचं काही नाही, पण आजूबाजूच्या लोकांना आमच्या शिवीगाळीची सवय झाली :) आधी त्यांना जरा आमचं बोलणं आक्षेपार्ह वाटायचं. पण नंतर त्यांना कळून चुकलं की हे पोट्टे सुधारणारे नाहीत, आपणच बदलावं. त्यांचा तो डिसिजन चांगला होता. 

तसं पाहिलं तर पंक्या पटापट दोस्त बनवतो. रिसेंटली तो दुसऱ्या टीममध्ये शिफ्ट झाला, आणि २-३ दिवसातच त्याने तिकडेपण टोळी बनवली. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला राग लई कमी येतो. आणि प्रत्येक गोष्ट लाईटली घ्यायची सवय असल्यामुळे लोकही लवकर कनेक्ट होतात. पंक्यामुळे पारेख, अप्पी आणि बाकी पोट्टे आमच्या ग्रुप मध्ये आले, त्यांच्या बाबतीत नंतर कधी लिहीन. 

जरी पंक्या आता दुसऱ्या टीम मध्ये गेला, तरी आमचा धिंगाणा काही कमी नाहीये. सकाळी सकाळी ९ वाजता मी ऑफिसला येतो, तेव्हा अर्ध्या वाटेत असतानाच पंक्याचा पिंग येतो-- "लई भूक लागलीय, कधी येणारेस?".  अजूनही आमचा ब्रेकफास्ट सोबतच होतो, आणि मग खाली टपरीवर जाउन स्पेशल चाय. तिथंही वाह्यातपणा अजूनही चालूच आहे. विशेष म्हणजे टपरीवाला पण कधी कधी आमच्या वाह्यातपणात सहभागी होतो :)

तर असा हा पंक्या. लिहायला भरपूर काही आहे, पण नेमकं आत्ता लक्षात येत नाही :)

-पी. के. 

Thursday, February 7, 2013

कुत्री ("कुत्रा" शब्दाचं अनेकवचन)

हा काय विषय आहे का? अरे, पण ब्लॉगचं नावच उगाच काहीतरी आहे, म्हणून मी काहीही लिहू शकतो.
तर विषयाला लगेच हात घालू. 
माणसा खालोखाल पृथ्वीवर कुणाची संख्या जास्त असेल, तर मला वाटत की कोंबड्या आणि कुत्री. 
ता.क.: आता यात वाद घालण्यात काहीही अर्थ नाही, की कोंबड्या जास्त, की कुत्रे जास्त कि मुंग्या. मी बोलतोय म्हणलं की हं म्हणायचं.

तसं कुत्र्याचं आमच्या घरी सगळ्यांनाच वेड. आत्ता पर्यंत आम्ही २-३ कुत्रे पाळले असतील. ती गोष्ट वेगळी आहे म्हणा, कुत्रे कधी विकत नाही आणले. आमच्या मायबापांना लई हौस. एखादं पिल्लू गोंडस दिसलं की घाला त्याला पोळी, आणि आणा रोजचीच कटकट.

एक कुत्रा पाळला होता, आईनं त्याचं नाव 'ब्राउनी' ठेवलं. का? तर ब्राउन कलरचे ठिपके त्याच्या अंगावर होते. त्याला रोज चांगलाच खुराक असायचा. कधीकधी तर आई त्याला दुधात पोळी कुस्करून खाऊ घालायची. त्यावर माझा टोमणा-- "स्वतःच्या लेकरांना कधी कुस्करून खाऊ घातलं नाही, कुत्र्यांची लई माया!".
त्यावर आई म्हणायची-- "शिक त्याच्याकडून. तुझ्या पेक्षा जास्तच ऐकतो तो माझं. कमीत कमी घराकडे लक्ष तरी असतंय त्याचं".

एक भारी गोष्ट म्हणजे त्याला लहान मुलांची फार एलर्जी होती. गेटजवळ मुलांच्या खेळण्याचा आवाज आला तरी हा भुंकत जायचा. एके दिवशी चुकून कुणीतरी गेट उघडं ठेवलं, आणि समोरच्या शाळेचे पोट्टे खिदळत चालले. ब्राउनीचा राग अनावर झाला आणि लेकरांच्यामागे सुसाट लागला. 
सीन असा होता-- लेकरं पुढे.. त्यांच्या मागे ब्राउनी आणि त्याच्या मागे मी. कसं बसं १००-२०० मीटरची शर्यत झाल्यावर ब्राउनीला गाठलं, आणि सगळ्यात आधी त्याच्या साखळी वर पाय ठेवला. लेकरं आणि मी पळू-पळू दमलो, पण हा साला फुल मूडमध्ये होता.
 
मला फार सवय होती.. येता-जाता त्याच्या कानफाडीत झापड मारायची. आधी तो लहान असताना क्वाय-क्वाय करून बोम्बलायचा. पण नंतर नंतर त्याने दादागिरी चालू केली. एके दिवशी अशीच जोरात कानशिलात हाणली, आणि त्याने माझा तळहात चावला. ब्राउनीनं 'कुत्र्या'सारखा मार खाल्ला त्यादिवशी. पण माझ्या चुकीमुळे बिचाऱ्याला बेघर व्हाव लागलं. काय शिव्या खाल्ल्या मी आईच्या.. बाप रे. एक तर ब्राउनी घर सोडून गेला, आणि दुसरी गोष्ट मला ४ इंजेक्शन्स घ्याव लागले होते.

त्यानंतर कुत्रे आणि माझ्यात हाडवैर झालं. याचा अर्थ असा नाही, की मी कुत्र्यांना भ्यायला लागलो.
काही दिवसांनी कळलं की माझ्या भरपूर मित्रांना कुत्र्यांची भीती वाटते. उदा. अज्या, डक्क्या, इ.

अज्या तर कहर होता. रात्री आमची मीटिंग संपली, आणि घरी जाताना गल्लीच्या तोंडाशी एखादा कुत्रा दिसला, तर अज्या तासंतास तिथंच बसून राहायचा. जेव्हा तो कुत्रा तिथून निघून जाइल तेव्हाच अज्या घरात जाई.

पंक्या आणि मी चहा पिताना कुत्र्यांचे डिस्कशन करतो. म्हणजे हा कुत्रा आता काय बोलत असेल? समोरच्या कुत्र्याची काय प्रतिक्रिया असेल? असं.

मागच्या दिवाळीला डक्क्याने कार घरी घेऊन जायचा प्लान ठरवला. जाता जाता एक कुत्रा त्याने यमसदनी पाठवला. त्यानंतर प्रत्येक कुत्रा त्याचा वैरी झाला. परवा आम्ही लोहगडावर चाललो होतो, आणि वाटेत बरेच कुत्रे दिसले. आम्ही त्यांना हाय-बाय करत चाललो होतो, पण एका कुत्र्याने डक्क्याची हलकट नजर ओळखली आणि आमच्या मागेच लागला. डक्क्या एवढा दचकला की त्याने चौधरीची अनमोल बॉटल हातातून सोडून दिली. नशीब, माझा मोबाईल फेकला नाही. एकवेळ माझा मोबाइल पडला असता तर मी कमी शिव्या दिल्या असत्या. पण चौधरीने अर्धा तास डक्क्याचा दिमाख खाल्ला. का? तर बॉटल पाडली! ती पण कुत्र्याच्या भीतीने!

असो, श्वान-पुराणात इतकंच!

-पी.के.

Monday, January 21, 2013

Whatsapp, Gtalk and Much more..

Not so long ago, I mean 4-5 years back we used to communicate with just mails. Then came the 'era' of chatting. That time the only communicators available were Yahoo chat, and Skype. Later, Google came with inbuilt chat in GMail. (Pardon me, if the sequence is wrong).

But a couple of years ago, Google jumped in the mobile sector and brought their phones under the name 'Android'. Of course, Google gave its GMail and Google Talk inbuilt in them. This OS became much popular and people were 'Online' on the go. Now they got 'connected'.

But with the invent of this Google Play Store (Market, Previously) there are so many apps available for users, free. Recently one communicator is making a boom. That's Whatsapp!

This app is available on various platforms like Android, iOS, Symbian and many others. The good thing is, this app does not need any email ID or login. Just enter your phone number and that's it. It scans for contacts in your phone and detects who else in your contacts has this app. It adds them in yours.

 What's special about this app? Well, this allows you to chat, has a variety of emoticons, allows you to send pics, small videos and voice messages! Impressive, but what's the big deal?

Even Google talk, which is inbuilt, gives you the option of Voice chat (remember, this is kinda real-time), Video Chat! So, I wonder why do people use Whatsapp when they have Google Talk inbuilt?

May be they don't wanna go online on Google Talk because their managers or TL's would see them online. Okay? But many people who use Whatsapp seem to be online on Google Talk too. What about them? I feel that's a mystery. Or may be they wanna use something different, unconventional which gives them feel of using high-tech apps :P

But really, Whatsapp is kind of annoying for me. If you compare it with Google Talk, I find it worse. Why would someone use a communicator which takes more than 10-15 seconds to deliver a message? The same message can be delivered by GTalk instantly! Moreover, you use it for voice messages.. Come on! You can use GTalk to have a voice chat just like a phone call!!

Today I felt like Whatsapp should really think of building it's own OS and convincing phone manufacturers to make models hereafter. You'll see the same thing as my google status set today morning :)


-pk

Sunday, January 20, 2013

Bug found in a recent movie

Google has made it bit difficult to type in Marathi these days, that's why I'm posting my blogs in English nowadays. I'll come to the title in no time.

If you watch bollywood movies recently, you'll find it hard to get a movie with a new story. Almost all movies have stories stolen from south indians. The worst part is that they're remaking it just the way it was in south India.

Examples are Ghajini, Wanted, Singham, Rowdy Rathod and so on. May be the unbelievable fights in these movies are 'digestible' in South India, but we found them extremely annoying. 

Now, I'll give an example of how they make movies without thinking a little bit. Singham was a movie in South India, and as many people know South Indian people use their father's name as last name. So, it was possible that someone would have Singham as his last name.

Guys in bollywood thought of remaking this movie, and thought to show the hero as a Marathi guy. But Marathi people have Surname (family name) as their last name. Obviously Bajirao must be first name of the hero and Singham would be his surname.

Did you observe even hero's dad in the movie calls him by the name 'Singham'? It'd be like a dad calling his son by their family name!! I never heard of this.
At least my dad never called me 'Hey Kulkarni, come here'
Neither I heard my friends' dad calling them like 'Beta Deshpande, where are you?'

So you see where's the bug?

-pk